Sunday, March 6, 2011

ब्लॉग लिहिण्यास कारण कि...

शाळेत परीक्षेत मराठीच्या  पेपर मध्ये येणारा हमखास प्रश्न - औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र! मार्क - पुरते आठ..
        आणि मग पत्र लिहिण्यास घेतल्यावर हमखास येणारी ओळ म्हणजे - "पत्र लिहिण्यास करण की..." - तसच काहीस आत्ता मला लिहावास वाटतंय- "ब्लॉग लिहिण्यास कारण की .."
      ... पण पेपर मध्ये पत्र लिहिण्याचे कारण परीक्षकाने आयत दिलेले असायचे...आणि इथे माझा हाच मोठा प्रोब्लेम झालाय...
          स्वतःचा ब्लॉग तयार केला, अगदी पटकन स्वतःची चारोळीही लिहिली... पण नंतर कित्येक दिवस  माझ्या ब्लॉगच पान कोरंच...कारण ब्लॉग लिहिण्याचे कारणच सापडत नव्हत... खरतर आताही मला ते उमजत नाहीय..
          का लिहावा मी ब्लोग? स्वतःसाठी...की दुसऱ्यांनी माझ लिखाण वाचाव यासाठी... बर मी लिहिलेलं इतरांनी का वाचाव? rather ते कोणी वाचेल का??...इथपासून सुरुवात आहे मनात...
          "आयुष्यात आपल्याला अक्कल आलेय" अस मला उगाचच वाटू लागल्यापासून                       माणसांना "माणूस" म्हणून जाणून घेण्याची जी वाईट सवय लागलेय त्या सवयीचे व्यसन कराव अशी इच्छा आहे- म्हणजे माझी आई- आई असण्याआधीही एक माणूस आहे हा विचार डोक्यात सतत असल्याने मला तिला समजण सोपं जात.. हा माझा बऱ्याच वर्षांपासूनचा समज किंवा गैरसमज!
          पण याच माझ्या गैरसमजाला खतपाणी घालून मी मनात जपलेल्या, आयुष्यात भेटलेल्या अनेक माणसांच "माणूसपण" शब्दात मांडण्याचा प्रयोग करावा अस म्हणतेय.. 
        हं...ब्लॉग लिहिण्यास कारण की रोजच्या दिनक्रमात असे अनेक क्षण येतात, माणसं भेटतात की जे नंतर "अनुभव" किंवा त्याहीपेक्षा "आठवण" म्हणून आयुष्यभर पुरतात...
        अशाच अनुभवांची त्याहीपेक्षा आठवणींची साठवण करावीशी वाटतेय म्हणून हा ब्लॉग रुपी अल्बम...
कदाचित त्यातली एखादी आठवण वाचून कोणालातरी वाटून जाईल," अरे मलाही असच काहीस आठवतंय.."
          

2 comments:

  1. स्नेहल, आठवणींच्या झोतावर आम्ही बसायला तयार आहोत

    ReplyDelete
  2. माझी आई- आई असण्याआधीही एक माणूस आहे हा विचार डोक्यात सतत असल्याने मला तिला समजण सोपं जात..
    I didnt get that

    ReplyDelete