आज... आत्ता....मध्यरात्री साधारण १:४५ वाजता मिणमिणत्या प्रकाशात समोर असलेल्या कोऱ्या कागदावर काहीतरी लिहायला घेतलं...तर काही वेळ काहीच सुचेना....मुळातच समोर पडलेला कोरा कागद भरण्यासाठी काहीतरी लिहावं हेच चुकीच....म्हणजे इतक उदंड डोक्यात साचलं पाहिजे कि कागद दिसताच लिहित सुटावं...किंवा लिहिण्यासाठी कागद शोधला जावा....
अगदी काहीही....म्हणजे कोणत्याही विषयावर....बाल्कनीत उमललेल्या फूलापासून... ते झाडावरून गळून पडलेल्या पानापर्यंत...कानाला रिझवणार्या झर्याच्या खळखळाटापासून... ते पाणी टंचाईने बहुतेकदा रिकाम्या राहणाऱ्या भांड्यांच्या खडखडाटापर्यंत....ट्रेनच्या गर्दीपासून.... ते माळरानावरच्या निरव शांतातेपर्यंत....धारावीच्या बकाल वस्तीपासून.... ते फोर्टच्या आलिशान घरापर्यंत.....
उत्सवाच्या धामधूमीपासून.... ते बॉम्बस्फोटाच्या आक्रोशापर्यंत.....हळुवार जपलेल्या नात्यापासून.... ते ताणून तुटलेल्या नात्यापर्यंत....जागतिक ,... आर्थिक ,नैसर्गिक,...वैज्ञानिक घडामोडींपासून.... ते स्वार्थी,... आत्मकेंद्री,...भावनिक,... नैसर्गिक ,...वैचारिक उलथापालथेपर्यंत.....अगदी कशावरही लिहिता आलं पाहिजे....
....कधीही...कसही...कुठेही....खूप जास्त....आणि खूप चांगल लिहिता आलं पाहिजे...आणि याकरता माझ लिहिण्यातल झपाटलेपण वाढलं पाहिजे ....लिहिण्याचं...त्याहीपेक्षा चांगल लिहिण्याचं वेड लागलं पाहिजे....तरच माझ्यातलं लिहिण्याचं काहीस हरवलेलं माझ शहाणपण मला परत सापडेल...
अगदी काहीही....म्हणजे कोणत्याही विषयावर....बाल्कनीत उमललेल्या फूलापासून... ते झाडावरून गळून पडलेल्या पानापर्यंत...कानाला रिझवणार्या झर्याच्या खळखळाटापासून... ते पाणी टंचाईने बहुतेकदा रिकाम्या राहणाऱ्या भांड्यांच्या खडखडाटापर्यंत....ट्रेनच्या गर्दीपासून.... ते माळरानावरच्या निरव शांतातेपर्यंत....धारावीच्या बकाल वस्तीपासून.... ते फोर्टच्या आलिशान घरापर्यंत.....
उत्सवाच्या धामधूमीपासून.... ते बॉम्बस्फोटाच्या आक्रोशापर्यंत.....हळुवार जपलेल्या नात्यापासून.... ते ताणून तुटलेल्या नात्यापर्यंत....जागतिक ,... आर्थिक ,नैसर्गिक,...वैज्ञानिक घडामोडींपासून.... ते स्वार्थी,... आत्मकेंद्री,...भावनिक,... नैसर्गिक ,...वैचारिक उलथापालथेपर्यंत.....अगदी कशावरही लिहिता आलं पाहिजे....
....कधीही...कसही...कुठेही....खूप जास्त....आणि खूप चांगल लिहिता आलं पाहिजे...आणि याकरता माझ लिहिण्यातल झपाटलेपण वाढलं पाहिजे ....लिहिण्याचं...त्याहीपेक्षा चांगल लिहिण्याचं वेड लागलं पाहिजे....तरच माझ्यातलं लिहिण्याचं काहीस हरवलेलं माझ शहाणपण मला परत सापडेल...
No comments:
Post a Comment